Thursday, 27 February 2014

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी

स्वा. सावरकर स्मारकात आत्मार्पण दिनी चर्चासत्राचा सूर 

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जोपर्यंत मध्यमवर्गीय समाज आपली मानसिकता बदलत नाही तसेच जनमताचा रेटा लावत नाही, तोपर्यंत समाजमन बदलणार नाही. असा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या सावरकरांची विजाननिष्ठा व सुशिक्षितांची अंधश्रद्धा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात व्यक्त झाला. 

अत्यंत रंगतदार झालेल्या या चर्चासत्रात प्रसिद्ध विजान कथा लेखक बाळ फोंडके, खासदार भारतकुमार ऱाऊत यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका मंजिरी मराठे यांनी केले. प्रारंभी स्मारकाचे संस्थापक सदस्य विक्रमराव सावरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, मंजिरी मराठे, अनुराधा खोत, राजेंद्र वराडकर आदी मान्यवर तसेच सावरकरभक्त व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता बदलली गेली पाहिजे, सध्या आपल्या राज्यात अनेक कायदे अस्तित्वात आहेत. मात्र त्याचे पालन कितीजण करता, हा संशोधनाचा विषय आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदादेखील समाजाने प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी 1-2 पिढ्या जाव्या लागतील. असे विचार बाळ फोंडके यांनी व्यक्त केले. श्रद्धा ही प्रवृत्तींवर अवलंबून असते. स्वतःच्या मनःशांतीसाठी जर अध्यात्माचा स्वीकार केला तर ती अंधश्रद्धा असू शकत नाही, समाजात तणाव निर्माण करणा-या किंवा हानीकारक बाबी याला मात्र अंधश्रद्धा म्हणून विरोध झालाच पाहिजे. सुशिक्षित समाज अंधश्रद्धा पाळतो किंवा अशिक्षित समाजच पाळतो, असा भेदभाव असू शकत नाही. अशिक्षित मंडळी देखील विजानवादी असतात. त्यामुळे अशा बाबी वर्गीकरणाच्या चौकटीत असू शकत नाही. त्याच्याकडे डोळस नजरेने पाहणे आणि भावनाविश्वात आनंद मिळेल, अशाच बाबींचा स्वीकार, अवलंब व अनुकरण आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

राजकारणी मंडळींसाठी अंधश्रद्धा हा विषय अनुयायांच्या अनिवार्यतेतून आलेला असतो, अनेकदा नेते मंडळींना आपल्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार अवलंब करावा लागतो. समाजातील या बाबी केवळ संस्कारातूनच दूर होऊ शकतील. संस्कार हा स्वतःच्या मनःशांतीसाठी असावा. अध्यात्माचा स्वीकारदेखील त्यातूनच व्हावा. हिंदू धर्म उदारमतवादी मानला जातो. पण आजही अनेक देवळांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नाही, ही अंधश्रद्धाच आहे. गीतेमध्ये सांगितलेले जान हे तत्वजान आहे. मात्र या गीतेलाच देव्हा-यात बसवून किंवा तिच्या साक्षीने वाईट कृत्य न करण्याची शपथ घेणे व नंतर त्याच्या विरोधात वागणे, हे परस्पर विरोधी आहे. दांभिकपणा आहे. त्याच्याकडे समाजानेच डोळसपणे पाहिले पाहिजे. आपला दबाव याबाबतीत निर्माण केला पाहिजे. महाराष्ट्राला अनेक समाजसुधारकांची परंपरा आहे. या परंपरेतील मंडळी राजकारणी नव्हती. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी मंडळीं मोठ्या प्रमाणावर होती. पण नंतरच्या काळात ती झाली नाहीत, अशी खंत खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली. 

द्वारकानाथ संझगिरी यांनी आपल्या प्रसिद्ध खुमासदार शैेलीत दोघांकडून प्रश्नांची उत्तरे मिळवली. त्याचबरोबर आपण नास्तिक होतो पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य वाचल्यानंतर डोळसपणे श्रद्धेकडे पाू लागलो, असे विचार त्यांनी व्यक्त केले. पु. ल. देशपांडे यांनी सावरकर दर्शन कार्यक्रमात केलेल्या भाषणांच्या आधारे सावरकरांच्या विचारांवरील प्रश्नांची निर्मिती केलेले हे चर्चासत्र उत्तरोत्तर रंगत गेले. त्याला उपस्थितांनी अनेकदा टाळ्यांच्या कडकडाटात साद दिली. शेवटी मंजिरी मराठे यांनी संपूर्ण वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment