Thursday, 27 February 2014

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी

स्वा. सावरकर स्मारकात आत्मार्पण दिनी चर्चासत्राचा सूर 

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जोपर्यंत मध्यमवर्गीय समाज आपली मानसिकता बदलत नाही तसेच जनमताचा रेटा लावत नाही, तोपर्यंत समाजमन बदलणार नाही. असा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या सावरकरांची विजाननिष्ठा व सुशिक्षितांची अंधश्रद्धा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात व्यक्त झाला. 

अत्यंत रंगतदार झालेल्या या चर्चासत्रात प्रसिद्ध विजान कथा लेखक बाळ फोंडके, खासदार भारतकुमार ऱाऊत यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका मंजिरी मराठे यांनी केले. प्रारंभी स्मारकाचे संस्थापक सदस्य विक्रमराव सावरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, मंजिरी मराठे, अनुराधा खोत, राजेंद्र वराडकर आदी मान्यवर तसेच सावरकरभक्त व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता बदलली गेली पाहिजे, सध्या आपल्या राज्यात अनेक कायदे अस्तित्वात आहेत. मात्र त्याचे पालन कितीजण करता, हा संशोधनाचा विषय आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदादेखील समाजाने प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी 1-2 पिढ्या जाव्या लागतील. असे विचार बाळ फोंडके यांनी व्यक्त केले. श्रद्धा ही प्रवृत्तींवर अवलंबून असते. स्वतःच्या मनःशांतीसाठी जर अध्यात्माचा स्वीकार केला तर ती अंधश्रद्धा असू शकत नाही, समाजात तणाव निर्माण करणा-या किंवा हानीकारक बाबी याला मात्र अंधश्रद्धा म्हणून विरोध झालाच पाहिजे. सुशिक्षित समाज अंधश्रद्धा पाळतो किंवा अशिक्षित समाजच पाळतो, असा भेदभाव असू शकत नाही. अशिक्षित मंडळी देखील विजानवादी असतात. त्यामुळे अशा बाबी वर्गीकरणाच्या चौकटीत असू शकत नाही. त्याच्याकडे डोळस नजरेने पाहणे आणि भावनाविश्वात आनंद मिळेल, अशाच बाबींचा स्वीकार, अवलंब व अनुकरण आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

राजकारणी मंडळींसाठी अंधश्रद्धा हा विषय अनुयायांच्या अनिवार्यतेतून आलेला असतो, अनेकदा नेते मंडळींना आपल्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार अवलंब करावा लागतो. समाजातील या बाबी केवळ संस्कारातूनच दूर होऊ शकतील. संस्कार हा स्वतःच्या मनःशांतीसाठी असावा. अध्यात्माचा स्वीकारदेखील त्यातूनच व्हावा. हिंदू धर्म उदारमतवादी मानला जातो. पण आजही अनेक देवळांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नाही, ही अंधश्रद्धाच आहे. गीतेमध्ये सांगितलेले जान हे तत्वजान आहे. मात्र या गीतेलाच देव्हा-यात बसवून किंवा तिच्या साक्षीने वाईट कृत्य न करण्याची शपथ घेणे व नंतर त्याच्या विरोधात वागणे, हे परस्पर विरोधी आहे. दांभिकपणा आहे. त्याच्याकडे समाजानेच डोळसपणे पाहिले पाहिजे. आपला दबाव याबाबतीत निर्माण केला पाहिजे. महाराष्ट्राला अनेक समाजसुधारकांची परंपरा आहे. या परंपरेतील मंडळी राजकारणी नव्हती. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी मंडळीं मोठ्या प्रमाणावर होती. पण नंतरच्या काळात ती झाली नाहीत, अशी खंत खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली. 

द्वारकानाथ संझगिरी यांनी आपल्या प्रसिद्ध खुमासदार शैेलीत दोघांकडून प्रश्नांची उत्तरे मिळवली. त्याचबरोबर आपण नास्तिक होतो पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य वाचल्यानंतर डोळसपणे श्रद्धेकडे पाू लागलो, असे विचार त्यांनी व्यक्त केले. पु. ल. देशपांडे यांनी सावरकर दर्शन कार्यक्रमात केलेल्या भाषणांच्या आधारे सावरकरांच्या विचारांवरील प्रश्नांची निर्मिती केलेले हे चर्चासत्र उत्तरोत्तर रंगत गेले. त्याला उपस्थितांनी अनेकदा टाळ्यांच्या कडकडाटात साद दिली. शेवटी मंजिरी मराठे यांनी संपूर्ण वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

Monday, 24 February 2014

ज्येष्ठ हिंदुसंघटक विक्रमराव सावरकर यांचे निधन





ज्येष्ठ हिंदुसंघटक विक्रमराव सावरकर यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक सदस्य व हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कृतिशील कार्यकर्ते विक्रमराव सावरकर यांचे रविवार (ता. 23) दुपारी एक वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी स्वामिनी, दोन मुलगे पृथ्वीराज व रणजित आणि स्नुषा असा परिवार आहे. या वृत्तामुळे सावरकरभक्त, देशप्रेमी व हिंदुत्वनिष्ठ नागरिकांमध्ये एकच शोककळा पसरली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे व त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र असलेल्या विक्रमराव यांनी जाज्वल्य देशभक्तीचा व्रत स्वीकारत हिंदुमहासभेसाठी कार्य केले. त्यांच्या हिंदु संघटन कार्यामुळे त्यांचा एक विशेष प्रभाव हिंदुमहासभेच्या कार्यावर राहिला आहे. ऱाष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी देशभर अखंड हिंदुस्थान तसेच समान नागरी कायदा, हिंदूंचे रक्षण आदींसाठी कार्य केले तसेच त्यांचा अनुयायीवर्ग देखील संपूर्ण भारतभर निर्माण केला. सिमला कराराला विरोध करण्यासाठी गनिमी काव्याने त्यांनी सिमल्यात इंदिरा गांधी यांच्याकडे निषेध केला. मुंबई महानगरपालिकेत वंदे मातरम् हे देशभक्ती गीत म्हणावे, यासाठी मोर्चा काढला तसेच विधानसभेत चर्चा घडवून आणली. त्यावेळी विधानसभेने हिंदुमहासभेच्या कार्यकर्त्यांना शिक्षादेखील सुनावली होती. मात्र आंदोलन यशस्वी झाले. भिवंडी येथे शिवजयंती मिरवणूक निघावी, मलंग गडावरील बंदी दूर व्हावी यासाठी त्यांनी यशस्वी आंदोलनं केली. हिंदुत्वासाठी राजकीय कृतीशील कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखालीदेखील अटक करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून ठाणे येथे सैनिक शाळा त्यांनी सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते संस्थापक सदस्य होते. प्रकृती अस्वस्थ असली तरी ते सावरकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारकाचे अनेक उपक्रम प्रत्यक्षात साकारले तसेच स्मारकाचे कार्य राष्ट्रीय स्तरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

त्यांच्या या निधनाचे वृत्त कळताच सावरकरभक्तांमध्ये तसेच त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक तसेच हिंदुमहासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी गर्दी केली. त्यांच्या निधनाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन गडकरी, खासदार भारतकुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ संझगिरी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक प्रगट केला आहे.


Monday, 10 February 2014

Baba Ramdev visits Swatantrayaveer Savarkar Rashtriya Smarak..


Baba Ramdev visits Swatantrayaveer Savarkar Rashtriya Smarak...
राष्ट्रगुरू सावरकरांच्या स्वप्नातील

राष्ट्रनिर्मिती हवी - रामदेव बाबा

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रगुरु असून ते आपले आदर्श गुरूकुलमध्ये शिकत असल्यापासूनचे आहेत, त्यांच्या स्वफ्नातील राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण सगळ्यांनी एकजूटीने प्रयत्न केले पाहिजे, असे ठाम विचार बाबा रामदेव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना बळकटी देण्याचे काम आपण केले पाहिजे, त्यांचे हिंदुत्व तसेच हिंदुरक्षणाच्या विचारांना अवलंब आपण प्रत्यक्षात केला पाहिजे. त्यांना दोन वेळा जन्मठेप झाली तरीसुद्धा ते आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. त्यांच्या अंदमान येथील तुरुंगाला आपण भेट देणार असून तेथे योग शिबिराचे आयोजन करणार आहोत, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे आपल्यासाठी मंदिरासारखे आहे. स्मारकाशी आपले जुने संबंध असून ते दुसरे घरच आहे, असेही रामदेव बाबा यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर रामदेव बाबा यांनी अखंड भारत करके रहेंगे चा नारा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह अनुराधा खोत, सह कार्यवाह राजेंद्र वराडकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी स्मारकाची पाहणी केली. स्मारकाच्या वतीने त्यांना सावरकरांचा अर्धाकृती पुतळा, नुकत्याच प्रकाशित झालेल्या सावरकरांच्या उर्दू गझला आणि हिंदी गीतांवर आधारित हम ही हमारे वाली हैं, या सीडीची प्रत तसेच माझी जन्मठेप यांची भेट देण्यात आली. यानंतर त्यांनी स्मारकाच्या मुष्टियुद्ध केंद्राची तसेच रायफूल शूटिंग रेंजची पाहणी केली. यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच बंदूक हाताळताना त्यांनी अव्वल व अचूक नेमबाजी करून उपस्थितांना थक्क केले.